Saturday, 8 August 2020

माझ्या कविता 48

आठवतो भूतकाळ जेव्हा
मनात काहूर दाटतयं
हल्लीच्या या दुनियेमध्ये
खूपच अस्वस्थ वाटतयं

मुक्त स्वच्छंदी पक्षासारखं
होत बालपण अवघं
या फांदीवरून त्या फांदीवर
खेळत रहायचे चार-चौघं

सांज-सकाळी मधुर नाद
घुमत राही चिरंतन
मंजूळ कल्लोळ पाखरांचा
जसं चाले विचार मंथन

घातली भुरळ कोणी
मग फसत गेले सारे
नातीगोती झाली अंधूक
घुमू लागले स्वार्थी वारे

प्रेम भावना मन बाकी
अगदी नगण्य झाले
मिसळून धुळीस सारे
मात्र देखावे उभे केले

मिळेल मोकळा श्वास
इथे लढतोय प्रत्येक जण
होईल अंतःकरण शांत
असे शोधतोय दोन क्षण