अशी कोणती दुनियादारी
फारच होतेयं तोटकी
सुखी, आनंदी, संस्कारी
माणसं उरलींत मोजकी
गावामधल्या पारावर
चार माणसं जमायची
नव्हती बरं शिकलेली
सुख दुःख वाटायची
जसा हरवला संवाद
माणूस एकटं पडलयं
प्रेम आपुलकी माया
फक्त कागदावर उरलंय
आधुनिकतेच्या नावाखाली
वाटेल तसं राहायचं
आपऱ्या चिपऱ्या कपड्यावर
अंग प्रदर्शन करायचं
संस्कृतीला पायी तुडवून
कसलं आलय शहाणपण
खोटं अस्तित्व, मृगजळ
उगाच मिरवतंय मोठेपण
माणसा मधला माणूस
नेमका केव्हा मिळेल?
जगावं फक्त दुसऱ्यासाठी
खरच आनंद मिळेल
No comments:
Post a Comment