लिहायचं असतं बरच काही
शब्द मात्र फुटत नाही
शोधत असतो नवीन काही
कविता मात्र जुळत नाही
कुठे घडतय वेगळं काही
पेपर तर तोच आहे
म्हणावं तसं वैचारिक आता
हल्ली कोणी छापत नाही
पिढी गुंतली मोबाईल मध्ये
वाचन वगैरे दिसत नाही
शिक्षणावर तर बोलणंच नको
कोणीच मनावर घेत नाही
खरंच काही काळ होता
नवीन शिकत राहायचो
गुरुजी म्हणतील तसंच
अगदी तंतोतंत पाळायचो
भूत वर्तमान भविष्याची
सांगड तशी होत नाही
कुठे कुणाला वेळ तेवढा
ऐकून मात्र घेत नाही
म्हटलं बरं किती तरी
कलम काही सुटत नाही
दोन शब्द लिहिण्याचा
मोह काही आवरत नाही
No comments:
Post a Comment