असे कसे वागणे यांचे
आता डोईजड झाले
बिघडलेल्या औलादीला
मार शब्दाचे फार झाले
बस झाल्या मेणबत्या
पेटवून न्याय होत नाही
दोन दिवसाची आग सुद्धा
फार काळ जळत नाही
येतात, जातात आत-बाहेर
त्यांना काहीच फरक पडत नाही
दलाल आहेत ना जागोजागी
मग बातमी सुद्धा होत नाही
घडवले तिच्या न्यायासाठी
म्हणे रामायण, महाभारत
येतील का ते राम-कृष्ण
तिच्या न्याय, अब्रूसाठी परत
No comments:
Post a Comment