Tuesday, 16 April 2019

माझ्या कविता 30

नको कसली भीती 
नकोच कसले दडपण 
अभिमानाने जगूया आता 
शूरभूमीचे वारस आपण 

किती असतील प्रलोभने 
वा असतील बरेच दावे 
झुकणार नाही लोकराज्य 
ते सामर्थ्यशाली व्हावे 

मोजली कितीही किंमत 
मोल मात्र होणार नाही
अनमोल मत माझे
ही लोकशाही हरणार नाही 

आम्ही सर्व खंबीर आता 
मोडेल पण वाकणार नाही 
पुरोगामी विचार आमचा
स्वाभिमान विकणार नाही

No comments:

Post a Comment