Sunday, 9 June 2019

माझ्या कविता 35

इतिहास तर विसरता येणार नाही
शूरवीरांच्या रक्ताने, त्यागाने लिहिलाय ना
जपली ना खरच त्यांनी ती संस्कृती अन तुलाही
म्हणे आधुनिकतेच्या युगात प्रगती झाली
मग कशाची?
खरच नको का आत्मचिंतन करायला

तू होतेय बर फक्त उपभोगाची वस्तू
बसलाय ना हर एक विवस्त्र करायला
काही तर म्हणतील ही बाजार बडवी
सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा नेहमीच मांडते
तूला या भर बाजारात विकण्यासाठी
खरेदीदाराची तर काही कमी नाही
लागतेच ना कधी गुप्त तर कधी उघड बोली
मग करतय कोण कसली पर्वा

अंतःकरण भरतं कधी
अन जीवही तूटतो सारखा
कशी पुसली असतील ती अक्षरे
लिहली होती त्या कणखर हाताने
श्वास गुदमरतोय अन त्याचाही बळी
घेतला जातोय
मरतोय ना तो वारसा अन इतिहास
झालं तर काही भूतकाळात, आजही
कदाचित घडेल ऊद्याही
नकोय कुणाला ऊद्याची फिकीर
स्वार्थानं बरबटलेला माणूस
आणखी विचार तरी काय करेन?
ऊघडा डोळे बघा नीट
अंधकार दूर करून नवीन ज्योत पेटता येते का?


No comments:

Post a Comment