Saturday, 16 May 2020

माझ्या कविता 45

होता जसा गाव माझा
हल्ली तसं भासत नाही
गावामधला पार सुद्धा
गजबजलेला दिसत नाही

सोशल मिडियाची किमया भारी
पोरं झालीये मग्न
नाही नोकरी, नाही धंदा
मग आयुष्य वाटतंय भग्न

नूसतच मेलं राजकारण
अन फक्त कुरघोडी
सत्तेसाठी काहिपण
साले करतात घरफोडी

खरंच होती नाती सुंदर
नव्हतीच कोणती हाव
आपण आहोत एक सारे
पवित्र असे हा भाव

भेटतील का हो माणसं तशी
ज्यांनी जपला खरा गांव
येतील का ते सुंदर क्षण
सांगा ना तूम्ही राव !

No comments:

Post a Comment