Saturday, 8 August 2020

माझ्या कविता 48

आठवतो भूतकाळ जेव्हा
मनात काहूर दाटतयं
हल्लीच्या या दुनियेमध्ये
खूपच अस्वस्थ वाटतयं

मुक्त स्वच्छंदी पक्षासारखं
होत बालपण अवघं
या फांदीवरून त्या फांदीवर
खेळत रहायचे चार-चौघं

सांज-सकाळी मधुर नाद
घुमत राही चिरंतन
मंजूळ कल्लोळ पाखरांचा
जसं चाले विचार मंथन

घातली भुरळ कोणी
मग फसत गेले सारे
नातीगोती झाली अंधूक
घुमू लागले स्वार्थी वारे

प्रेम भावना मन बाकी
अगदी नगण्य झाले
मिसळून धुळीस सारे
मात्र देखावे उभे केले

मिळेल मोकळा श्वास
इथे लढतोय प्रत्येक जण
होईल अंतःकरण शांत
असे शोधतोय दोन क्षण

Friday, 31 July 2020

माझ्या कविता 53

सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं? धृ.

सुखी संसाराचे स्वप्न पाहत
बाप कित्येक रात्री जागला
करून रक्ताचं पाणी 
तो पोरांसाठी राबला
मांडून बाजार शिक्षणाचा
त्यांनी मात्र हवं तसं लाटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       1

म्हटला होतात एकदा तुम्ही
अभ्यास करून हो सेट-नेट
अहो प्राध्यापकीचा सुद्धा बरं का
वाढत चाललाय रेट
नोकरीच्या शोधात मात्र
आयुष्याचं गणित हुकलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       2

विनाअनुदानाचा शिक्का त्यांनी
आमच्या माथी मारला
इथंच खरंतर प्रत्येकजण
डाव आयुष्याचा हरला
जेव्हा आला प्रश्न पोटाचा
हे क्षेत्रच नकोसं वाटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?        3

कसली तुमची संघटना
फक्त तुमचेच प्रश्न मांडणार
महागाई भत्ता पगार पेन्शन
यासाठीच मोर्चे काढणार
गरजवंताला नसतेच अक्कल
एवढं मात्र पटलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?        4

काय तर म्हणे सरकार आता
नवीन धोरण राबवणार
विस्कटलेली घडी शिक्षणाची
एका चौकटीत बसवणार
देऊन अधिकार त्यांना
फक्त रान मोकळं केलं
सर तुम्हीच सांगा एकदा तरी
नेमकं आमचं काय चुकलं?       5

Thursday, 30 July 2020

माझ्या कविता 52

सांजकाळी एकांतवेळी
मन घुटमळते कुणीकडे
घेत शोध कुणाचा?
असे भिरभिरते चोहीकडे

चालून झालीत काही पाऊले
घ्यावा वाटतो विसावा
जरा थांबतो कुठेतरी
मुक्त पाझरण्या आसवां

बंद पिंजऱ्यात काही वेदना
छळून जातात मनास रे !
घालावी फुंकर कुणीतरी
अनं दुःख विरावे वार्‍यात रे !

Wednesday, 10 June 2020

माझ्या कविता 51

बाप सांगत लोकांना
माझं पोर शिकणार
दिवसरात्र राबलो
याचं चीज होणार

मला सुद्धा वाटायचं
आपण मोठं होणार
सुखी होतील मायबाप
असलं शिक्षण घेणार

पोटाला चिमटा काढत
तो मात्र राबायचा
शोधत दिवस सुखाचा
रात्रभर जागायचा

पाहून घाम बापाचा
मी ही लढत गेलो
शिक्षण पुर्ण करून
मग बेरोजगार झालो

घेऊन कागद डिग्रीचे
तसा दारोदार फिरत होतो
भरेल पोट सुखाने 
नोकरी अशी शोधत होतो

हातात घेऊन कागद
नकार मात्र द्यायचे
आहे का वशिला 
मुद्दामहून विचारायचे

बाकी नसेल वशिला
तूम्हाला पण घेणार
व्यवहार मात्र रोखठोक
टेबलाखालून होणार

कसलं बरं शिक्षण
फक्त गुलाम व्हायचं
विकून सर्व स्वाभिमान
मेल्यासारखं जगायचं

शिकून सुद्धा बरं का
शिकल्या सारखं वाटत नाही
फक्त विचाराच्या भाकडकथा
इथं पोट मात्र भरत नाही

Sunday, 24 May 2020

माझ्या कविता 50

एकेकाळी माझं सुद्धा
प्रेम नावाचं गाव होतं
रेखाटलेल्या शब्दरचनेत
फक्त तुझंच नाव होतं

गेलोच तुझ्या वाटेवरून
लपूनछपून पाहणं होतं
बरसणार्‍या वर्षा सरीत
मुक्तपणे भिजणं होतं
फुलासारखं बहरणं कधी
भुंग्यापरी फिरणं होतं
सुख दु:खाच्या क्षणोक्षणी
हसणं कधी रडणं होतं

भेटलो असतो एकदा तरी
नशीब मात्र रिक्त होतं
रेखाटलेल्या शब्दरचनेत
फक्त तुझंच नाव होतं
                

Saturday, 16 May 2020

माझ्या कविता 45

होता जसा गाव माझा
हल्ली तसं भासत नाही
गावामधला पार सुद्धा
गजबजलेला दिसत नाही

सोशल मिडियाची किमया भारी
पोरं झालीये मग्न
नाही नोकरी, नाही धंदा
मग आयुष्य वाटतंय भग्न

नूसतच मेलं राजकारण
अन फक्त कुरघोडी
सत्तेसाठी काहिपण
साले करतात घरफोडी

खरंच होती नाती सुंदर
नव्हतीच कोणती हाव
आपण आहोत एक सारे
पवित्र असे हा भाव

भेटतील का हो माणसं तशी
ज्यांनी जपला खरा गांव
येतील का ते सुंदर क्षण
सांगा ना तूम्ही राव !

Sunday, 26 April 2020

माझ्या कविता 47

शिकुन सवरून माणूस सुद्धा,
उगाच चुकतो आहे.
पांघरून कापडं माणुसकीची,
पशुसारखं वागतो आहे.

अहंकाराचा चढवून चष्मा,
लोकशाही मारतो आहे.
कुसंस्काराची रुजवून बीजं,
हिंस्र पिढी घडवतो आहे.

मान-मर्यादा, शिस्त, आदर
फक्त किताबी दिसतो आहे.
करून पायमल्ली कायद्याची,
थोरामोठ्यांना नडतो आहे.

अन्याय, दडपशाहीच्या जोरावर,
गरिबांना झुकवतो आहे.
धन संपत्तीच्या मोहामध्ये,
सत्यधर्म विसरतो आहे.

न्याय, दया, शब्द संस्कारी,
कैक किताबी लिहिले आहे.
वेचावी रत्ने सुसंस्काराची,
जिथे सुप्त विचार घडले आहे.

Wednesday, 15 April 2020

माझ्या कविता 42

होती है आंखे नम
कभी उनकी यादों मे ।
भुले तो सबकुछ फिर भी
वो सताते है ख्वाबो मै ।

जब चढ़ा था जुनून इश्क का
ना समझ पाये वो बेवफा ।
हर याद मिटायी दिलसे
और वो खफा हो गए हमसे ।

क्या खयाल भी आता हमारा
जिसने जान से भी चाहा है ।
हमे ना मिला कुछ भी लेकिन
पाना था जो वो भी खोया है ।

ऐ खुदा उनको हरपल खुशी दे
जिन्होंने हमे भुलाया है ।
वो तो छोड गए खुशी से अकेले
मगर हमे जिंदगीभर रुलाया है ।

माझ्या कविता 40

नमन श्री गणेशा । कृपा करा मज देशा ।
संकट हे अपार । तारावे जी के ॥

देवा तुझीच लेकरे । आस लावती बापडे ।
कर उद्धार तयांचा । हेच माझे साकडे ॥

अशी भयंकर महामारी । बेतली आयुष्यावरी ।
सोड तयातूनी आम्हा । सांगावा काय दोष ॥

तुच असे ठायी । वंदन तुझ्याच पायी ।
ऐका आर्त हाक । एका पामराची ॥

जीवा लागे घोर । रात्रंदिन विचार ।
संकटात माझी । सर्व प्राणीजात ॥

साधू संत लिहती । ऐसी घटा येईल ।
जग बंदी होईल । काही काळ मास ॥

जरी असेल कर्म । वा तयांचे प्रारब्ध ।
होतील मुक्त सारे । दावा आम्हा मार्ग ॥

असा व्हावा साक्षात्कार । अवतार दिव्य पुरुष ।
करावे पापमुक्त । सकळ जना ॥

तेही तुझेच रूप । आनंदी प्राणीजात ।
येईल तो दिन । रामा म्हणे ॥

Thursday, 2 April 2020

माझ्या कविता 38

रात्रंदिवस करून सायास,
पैसा मात्र जमवतो आहे.
स्वार्थाच्या या दुनियेमध्ये,
माणूस फक्त हरतो आहे.

 नव्हते त्याचे वैर कुणाशी,
बाकी मात्र छळतो आहे.
'मीच आहे सर्वकाही',
हा भ्रम फसवतो आहे.

नेहमीच देऊन बळी त्याचा,
म्हणे, मीच जिंकतो आहे.
कधी वाटते कीव बुद्धीची,
असलाच घात करतो आहे.

पुरे आता हा घोर अपराध,
हे काळच सांगतो आहे.
जरा आठवा  मानवधर्म्
भूतकाळ शिकवतो आहे.
                         

Friday, 17 January 2020

माझ्या कविता 44

कधी नव्हतेच मुळात एकटी
 होतेच प्रेम आणि आशीर्वाद
 हो! लढणार पुन्हा एकदा
 फक्त असणार तुमची साथ

 भरते स्फुरण माझ्यात
 हर एक थोर व्यक्ती
 हो! लढेल मीही आता
 पुन्हा एकवटून शक्ती

 झाले फितूर बहुत
 परवा कुणास नाही
 हर जन बंधू माझा
 मागे हटणार नाही

 येऊ दे आसमंत वादळ
 ही ज्योत तेवणार आहे
 हो! लढेल पुन्हा एकदा
 फक्त कमळ फुलणार आहे

माझ्या कविता 43

सोडता चाड जेव्हा तुम्ही 
डोळ्यात धुंदी आल्यावर
बोलावं लागतं रोखठोक
असं अगतिक झाल्यावर

स्वतःची पोळी भाजण्यात
झालात तुम्ही मग्न
बघा जरा त्याच्याकडे
जणू संसार पडलाय भग्न

करत असता कैक वायदे
म्हणे मदत आम्ही देणार
भेटतील खुर्चीवाल्यास फायदे
बरं का! अशीच नोंद होणार

तुम्ही करा चर्चा वाऱ्या 
बंद दाराच्या आत 
थांबवा सगळ्या भूलथापा
फक्त होतो सतत घात

वाटतं कधी आता 
नकोच तुमचा पैसा 
वाट पाहून थकलो आहे 
आभासी मृगजळ जैसा

माझ्या कविता 41

हर्षित रम्य
तेजोमय
रवि किरणात
झुलते, फुलते 
रानफुल

मंद वारा
 करतो लगट
भरतो आनंद
ह्रदयी आरपार
मोहते, खेळते
रानफुल

विसरून दुःख
जगवते कधी
भरवते चेतना
रानफूल

असेल गंधहिन
मनमोहक
ऊभे कणखर
स्वच्छंदी
रानफुल